पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातून त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. लवकरच मी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे, असे राज ठाकरे यांनी सागितले. त्यानंतर या दौऱ्याची तारीखही ठरली. मात्र या दौऱ्याची तारीख ठरताच उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना आता उत्तर प्रदेशात यायाचे असेल तर त्यांनी आधी जनतेची माफी मागवी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच राज ठाकरेंनी यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. असा पवित्राही त्यांनी घेतला. या सर्व प्रकारांनंतर राज ठाकरेंना धमकीचे पत्र आल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. आता राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याची मागणी अनेक संघटना करत आहे. आता पुण्यातूनही याच मागणीने जोर धरलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून राज्यात हिंदूत्वावरून रोज राजकारण रंगताना पहायला मिळतंय. त्यानंतर मशीदीवरील भोंग्यांनीही राजकाणातील भोंग्याचा आवाज वाढवला. आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणार विरोध आणि त्यांना आलेल्या धमक्या यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा ललकारलं; म्हणाल्या, त्यांनी 14 तारखेच्या सभेत..;
राज ठाकरे यांनी प्रखरपणे हिंदूत्वाचे समर्थन केल्यानंतर जिहादी मनोवृत्तीच्या संघटनांनी त्यांना धमक्या देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना संपूर्ण पोलीस संरक्षण देणे हे महाराष्ट्र शासनाचे कर्तव्य आहे, असे मत एकबोटे यांनी मांडले आहे. शासनाने जनतेच्या भावनांचा आदर राखून राज ठाकरे यांना संपूर्ण पोलिस संरक्षण द्यावं, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.
राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका उचलून धरल्यापासून अनेक हिंदू संघटना राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. तर अनेक संघनांचा त्यांना विरोधही होत आहे. राज ठाकरेंच्या भाषणांमुळे धार्मिक तेढ पसरत आहे, असा आरोपही या संघटना करत आहेत.
Read also:
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येईल, पण रोहित पवारांना नाही
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर