नवी दिल्ली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्देशा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करण्याचे गरजेचे आहे. असा पुर्नउच्चार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी 14 तारखेच्या सभेत पुढील विधानसभेसाठी निवडणुक कोणत्या मतदार संघातून लढवणार आहे. मी त्यांच्याविरोधात उभी राहुन निवडणुक जिंकून दाखवेन, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ललकारलं आहे.
उद्धव ठाकरे यांची ज्यावेळी म्हणजे 14 मे ला सभा होईल, त्या दिवशी आम्ही नवी दिल्लीत महाआरती करणार आहोत. तसेच राजद्रोहाच्या कलमाबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, राजद्रोहाचा कलम लावण्यात आलेल्या मी महाराष्ट्रातील पहिल्याच महिला खासदार बनली आहे. त्यामुळे आम्हाला कितीही त्रास दिला तरी आम्ही घाबरणार नाही. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
“तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
सत्तेच्या लालसापोठी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपासला असल्याचंही वक्तव्य केलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुक लढवली नाही. मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेचा लोभ आहे. त्यामुळे त्यांना मी पुन्हा एकदा चॅलेंज करते की, त्यांनी पुढील सभेत विधानसभेसाठी लढवणार असलेल्या मतदार संघाचं नाव जाहीर करावं. त्याचसोबत त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली आहे. असा घणाघात देखील त्यांनी चढवला.
दरम्यान, मागील दोन वर्ष उद्धव ठाकरे यांनी आजारपणाच्या कारणामुळे ऑफिसमध्ये गेले नाही. त्यांनी सर्व मेडिकल रिपोर्ट काढून मला द्यावे. त्यानंतर मी महिला असून देखील माझी सगळे रिपोर्टे काढून त्यांना देणार. मुंबई ही भ्रष्टाचाराची लंका झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी भ्र्ष्टाचार करून आपली संपत्ती वाढवली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read also:
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
- राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार