मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला होता. ‘राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही,’ असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज यांच्या या पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिरकस भाष्य केलं आहे.
उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
‘राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत मला माहिती नाही. मात्र मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्र येत असतात,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
उत्तर प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत सरकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले की, ‘याविषयी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र या देशात प्रत्येकाला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र आहे. आपणही महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी तिथे कार्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केली आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
“राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. भाजपने त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचं नेतृत्व एका भ्रष्ट नेत्याकडेच दिलं आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
Read also:
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- ‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकट्याने लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही’
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार