पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दररोज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना दिसत असतात. चंद्रकांत पाटील कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट लक्ष्य करतात. चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केले आहे. शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढूनही त्यांची अधोगती होते हे कोल्हापूरने दाखवून दिले आहे. ते एकत्र लढले तरीही त्यांना ९६ हजार आणि आम्हाला ७८ हजार मतं मिळाली. ९ हजार मतं अजून मिळाली असती तर ती पोटनिवडणूक आम्ही जिंकलोच असतो, असे पाटील म्हणाले. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावरुनही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
राज ठाकरेंनी जे पत्र लिहले ते पत्र मी वाचलं, त्यांचे पत्र समर्पक आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. मात्र, महाविकास आघाडीचं वागणं आणि व्यवहार तसाच दिसत आहे. याला उचल, त्याला पकड, खोट्या प्रकरणांमध्ये अडकवा आणि शेवटी महापालिका ताब्यात आहे म्हणून विरोधात बोलणाऱ्यांची घराला नोटीस पाठव, असे सगळे प्रकार सुरू आहे. अमर्याद अशी महाविकास आघाडी सरकारची दादागिरी सुरु आहे, असा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले की, एनआयएने ज्या धाडी टाकल्या त्यात काय सापडले याची माहिती मला नाही. देशाविरोधात काय सुरु आहे हे शोधायला यांना वेळ नाही. मात्र, भोंगे उतरवण्याच्या प्रकरणात हजारो मनसे कार्यकर्त्यांना अटक केली जाते. राज ठाकरे जे बोलत आहेत ते योग्य आहे. महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांचे लांगुलचालन करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरे यांच्याबाबत योग्य निर्णय ते घेतील. भाजप खासदारां तो वैयक्तिक अजेंडा आहे. राज ठाकरे यांनी बिहारी आणि उत्तर भारतीय लोकांबाबत त्या वेळी काय म्हटले, त्यांच्याविषयी काय बोलायला पाहिजे, जे काही बोलले ते अलीकडच्या सभांमध्ये बोलत आहेत. पण त्याबाबतचा निर्णय ते स्वत:च घेतील. देवेंद्र फडणवीस या विषयात जे काही करायचे ते करतील, असेही पाटील यावेळी म्हणाले.
Read also:
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
- भाजपमध्ये बंडखोरी करताच चंद्रकांत पाटलांनी माजी आमदाराला केलं 6 वर्ष निलंबित; काॅंग्रेसला फायदा झाल्याचा राग
- “तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”