मुंबई : भोंग्याबाबत केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड कऱण्यास सुरूवात केली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते आणि माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना पोलिसांवर दबाव टाकण्याचं काम सरकार करीत असल्याचा आरोप केला आहे.
मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
राज्याच्या इतिहासात कोणत्याच सरकारने खोट्या केसेस दाखल करणे, अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे अशा अतिरेकी कारवाया केलेल्या नाहीत. भाजपचे नेते व कार्यकर्त्यांवर तर रोज शेकडोंच्या संख्येने कारवाया होत आहेत आणि आता भोंग्यासाठी, हिंदुत्वासाठी आंदोलन केले म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांचा एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे तपास सुरु आहे. सरकारला हे सर्व शोभा देणारे नाही. मस्तवाल झालेल्या या सरकारने अक्षरश: राज्यात हैदोस घातला आहे. अशी खरमरीत टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आमच्या हातात सत्ता आहे, म्हणून आम्ही काहीही करु शकतो असा अहंभाव त्यांच्यात आलेला आहे. परंतु फार काळ सत्तेची मस्ती चालणार नाही, त्यामुळे सूडाचे राजकारण हे आपल्यावरही उलटू शकते, असा इशाराही दिला आहे. तर राजद्रोहाच्या गुन्ह्याच्यासंदर्भात विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे खरंच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे की, त्याचा गैरवापर होत आहे, अशा चर्चा आता समोर येत आहेत. यावर सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचे कलम लावणे योग्य ठरणार नाही असे नमूद करीत. या कलमाला स्थगिती दिलेली आहे. तेव्हा सरकार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भविष्यात योग्य ती कारवाई करेल. असंही ते म्हटले आहे.
किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
दरम्यान, अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? असा सवाल करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांबाबत देखील भाष्य केलं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत असते. सत्ता जात असते. त्यामुळे कुणीही सत्तेच ताम्रपट घेऊन आलेला नाही. असा इशारा दिला आहे.
Read also:
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
- राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार