मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अलिकडचे मुस्लिम संघटनांकडून धमक्या येत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांना आलेले धमकीचं पत्र देण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बैठक पार पडली असून राज ठाकरे यांच्या सुरक्षितेविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भुमिकेमुळे उर्दु भाषेत असलेलं धमकीचं पत्र राज ठाकरे यांना आलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जीवाची काळजी सर्व जण करीत होते. सध्या राज ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. त्यात आता राज्य सरकारने वाढ करून एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदाराचं समावेश केला आहे.
बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना आलेल्या धमकीवर राज्य सरकारला इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला. तर संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे स्टॅंटबाजी करीत आहे. महाराष्ट्रात कोणीही असुरक्षित नाही. महाराष्ट्रात कुणालाही काही होणार नाही, असं म्हणत टोला लगावला होता.
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
दरम्यान, राज्यातील मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप बघायला मिळाले होते. मनसेने मशिदीवरील भोंग्याबाबतची भूमिका लावून धरल्याने पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात सुरूवात केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं होतं.
Read also:
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!