पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा मराठी अभिनेत्री केतकी चितळेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तिच्यावर चहुबाजूनी जोरदार टिका होत आहे. तसेच शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केतकी चितळेचा समाचार घेतला आहे.
रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
केतकी चितळेंनी तिच्या फेसबुकवरून शरद पवार यांच्याबद्दल अगदी खालच्या पातळीवर टिका केली आहे. त्यात तिने तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे. सतरा वेळा लाळ गळे, समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप. ब्राम्हणांचा तुला मत्सर, कोण रे तु ? तु तर मच्धर, भरला तुझा पापघडा. गप नाही तर होईल राडा, खाऊन फुकटाचं घबाड, वाकड झालं तुझं थोबाड, याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड, असं तिने म्हटलं आहे.
मंत्रालयासमोरच कुटुंबीयांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सावधगिरीने मोठा अनर्थ टळला
दरम्यान, केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also:
- केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
- “देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”
- अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?