मुंबई – शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी तर संभाजीनगर बोलतो, मी संभाजीनगर म्हणतो म्हणजे झाले ना, त्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. ओ खैरे व्हा आता बहिरे, असे म्हणत फडणवीसांनी खिल्ली उडवली.
“औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
भाजपच्या हिंदुत्वापासून बाबरी पडण्याच्या मुद्दयावरून ठाकरे यांनी भाजप, फडणवीस आणि ‘आरएसएस’वर हल्ले चढविले होते. त्यावर उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमातील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचे सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण उद्धवजी म्हणाले असतील मॅडम आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो, आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.
अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो, फडणवीस म्हणाले. औरंजेबाच्या कबरीला भेटी दिल्याने फडणवीस यांनी आमदार अकबरुद्दीन औवेसी यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले, “काँग्रेस नेते ‘आरएसएस’ ला ज्या शब्दांत बोलतात. तेच आता उध्दव ठाकरे बोलत असून, इतिहास माहीत नसल्याने खोटे बोलत आहेत.
“खासगी नाही तर सरकारी रुग्णालयातच उपचार घ्या”; कोर्टाचा अनिल देशमुखांना धक्का
त्यांच्याकडे मुद्दा नसल्याने मुंबईला तोडण्याचा विषय काढतात. अरे कोणाच्या बापाची औकात आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. तुम्हाला इतिहास माहिती नाही. भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रेकॉर्डमध्ये प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी हे नाव आहे. जंगल सत्याग्रहात त्यांनी शिक्षाही भोगली. इतिहास पाहायचा नाही आणि मग बोलायचं. होय, मुंबई आम्हाला वेगळी करायची आहे, भ्रष्टाचार, अनाचारापासून वेगळी करायची आहे. काही लोक म्हणतात की मुंबई आमच्या बापाची आहे. मुंबई पूर्वी होती, मुंबई नंतर येईल, अनौरस मुलांचे ऐकले होते, अनौरसचे वडील पहिल्यांदाच ऐकत आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगेन. महाराष्ट्र असो की मुंबई. बाप एकच आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असेही फडणवीस म्हणाले.
Read also:
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेचाही होणार महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत तब्बल 12 ठिकाणी गुन्हे दाखल
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण