औरंगाबाद – शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी तर संभाजीनगर बोलतो, मी संभाजीनगर म्हणतो म्हणजे झाले ना, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. “ओ खैरे व्हा आता बहिरे”, असे म्हणत फडणवीसांनी खिल्ली उडवली.
केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
भाजपच्या हिंदुत्वापासून बाबरी पडण्याच्या मुद्दयावरून ठाकरे यांनी भाजप, फडणवीस आणि ‘आरएसएस’वर हल्ले चढविले होते. त्यावर उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमातील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचे सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण उद्धवजी म्हणाले असतील मॅडम आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो, आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.
दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईत सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ‘मी तर संभाजीनगर बोलतो, मी संभाजीनगर म्हणतो म्हणजे झाले ना’ असे विधान केले होते. तर, रविवारी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ‘ओ खैरे व्हा आता बहिरे’ असे म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची खिल्ली उडवली होती.
जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली. चंद्रकांत खैरे यांनी फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, पण त्यांनी नामकरण केले नाही असा आरोप
खैरे यांनी केला.
“विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. त्याचा मी पाठपुरावा केला. पण, केंद्राने ते ही केले नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करू नये, असा टोला खैरे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस मला बहिरे म्हणतात. आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा, तुम्ही खोटं बोलताय फडणवीस, असे खैरे म्हणाले आहेत.
Read also:
- “२५ वर्षे कशाला, २५० वर्षे म्हणा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान