नागपूर – गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. तसंच 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती ही नाना पटोले यांनी दिली. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
“आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
सरकारमध्ये सोबत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणतंय असं आरोप करत नाना पटोले यांनी याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. सोनिया गांधी यांनी तक्रार ऐकून घेतली असून येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यात पक्षांतर्गत निवडणुकीचे संकेत देत नाना पटोले यांनी राज्यात फेरबदल होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. राज्यात फेरबदल करणं हा हायकमांडचा निर्णय असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं. तसंच भाजपला पर्यात काँग्रेसच असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा पुढे केल जात असून बाबरी मशीद कुणी पाडलीय या वादात आम्ही जात नाही, आम्ही बांधणाऱ्यांमध्ये आहोत असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.
औरंगजेबाची कबर विरोधकांना आत्ताच दिसली का?; औरंगजेबाच्या कबरीवरून राऊतांचा भाजपाला सवाल
दरम्यान, चिंतन शिबिरात गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
देशाची स्थिती श्रीलंकेसारखी झालीय. भाजपने धर्म आणि जातीचं राजकारण केलं. उदयपूरच्या शिबीरात देश हिताचं चिंतन झालं असं म्हणत 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- नाना पटोलेंची राष्ट्रवादीविरोधात तक्रार; भाजप नेते म्हणाले की, “नाना पटोलेंचं वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण”
- 2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका