मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री असावा. त्यासाठी आमचं पुर्ण समर्थन असणार आहे. असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रामदास आठवले यांनी पुनर्रच्चार केला आहे. बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
“उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार 2024 च्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही. तसेच पुढच्या निवडणुकीत बहुमताने भाजप व आरपीआय पक्षाचे सरकार येणार आहे. यावेळी ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री बसावा याकरता आपले पुर्ण समर्थन आहे, असंही ते म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस या पदासाठी योग्य असून ते बहुजन समाजाबरोबर मराठा समाजाचे देखील नेते आहेत, असंही त्यानी भाष्य़ केलं.
“वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
बौद्ध धर्मानुसार भगवा रंग हा शांततेचा प्रतिक असून त्यानुसार राज्यात शांतता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनर्रच्चार केला आहे. रावसाहेब दानवे म्हणाले होते, की मी ब्राम्हण समाजाला फक्त नगरसेवक किंवा सरकारी नोकरीमध्ये नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं.
जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
दरम्यान, आगामी मुुख्यमंत्र्यांचा पदाबाबत अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कोणत्याही जातीतला किंवा तृतीयपंथीयांना 145 सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर ते सत्ता स्थापन करू शकतात किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. असंही त्यांनी म्हटलं होतं.
Read also:
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान