मुंबई : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुक असो की इतर अनेक राजकीय मुद्द्याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसची भूमिका ही भाजपला मदत करणारी राहिली आहे. गेल्या अडीच वर्षापासून राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याचं राजकारण करते आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपने यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोलेंनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.
‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
राज्यात अडीच वर्षापूर्वी ज्या मुद्दयांवर सरकार बनलं त्यांचं उल्लंघन करण्यात आलं. सोनिया गांधी यांचा अपमान करण्यात येत आहे. ते आम्ही सहन करणार नाही. एकूणच राष्ट्रवादीच्या भूमिकीची तक्रार हायकमांड केली आहे. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर बोलताना भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, संदर्भहीनस, बेताल बोलण्यात प्रसिद्ध आहेत. टोकाचा संघर्ष राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू असताना दोघांची युती आहे. असं वक्तव्य करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. असंही ते म्हणाले.
“उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात थोेड्या अधिक गोष्टी घडणार, तसेच नाना पटोलेंच्या वक्तव्याला आम्ही फारसं महत्व देत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
“वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
दरम्यान, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आघाडीतून काॅंग्रेस बाहेर पडते की काय ? असं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचबरोबर आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका देखील होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पुढे काय घडामोडी घ़डणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- 2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल