मुंबई : आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्या ज्या ठिकाणी पाऊस नसणार नाही, त्याठिकाणी निवडणुका घेण्यास काही हरकर नाही? असं न्यायालायच्या सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. तसेच जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत.
“आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका रखडल्या होत्या. त्यावर न्यायालयात अनेक वेळा युक्तीवाद कऱण्यात आला. मात्र त्यावर तोडगा काही काढू शकले नाहीत. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ज्या ठिकाणी पाऊस नसणार, त्याठिकाणी निवडणुका घेण्यास काही हरकर नाही. असं म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात निवडणुका लवकर होणार का? ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
दोन आठवड्यापुर्वी म्हणजे 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक प्रक्रिया जाहीर कऱण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाला दिले होते. त्यामुळे निवडणुका ऐन पावसाळ्यात होणार का? त्याकडे कुतुहल निर्माण झालं होतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निवडणुका जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. कारण जुन आणि जुलै महिन्यात पावसाचं वातावरण जास्त असतं. त्याचबरोबर त्यावेळी अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होते.
“जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग इतक्या साऱ्या निवडणुका एका टप्प्या न घेता त्या 2 किंवा 3 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान 6 आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऐनपावसाळ्यात सगळेच लोक आपल्या कामात व्यस्त असतात. तसेच अनेक राज्य कर्मचारीही देखील कामात व्यस्त असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का देखील घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर अखेरीस जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
- क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
- “शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
- “यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार