मुंबई – सर्वत्र सध्या शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते ते म्हणाले, ‘मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता.’ पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत यावर खोचक टीका केली आहे.
जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
‘दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये राज ठाकरे आणि राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरुन हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते.’
Did UT leave the movie “Dharma veer”because he couldn’t see the tragic end?
Don’t think so..
He left bcz he cudnt see Raj saheb n Rane saheb bein glorified in front of his eyes..
Also proves tat he was no where in the building of the Sena..The truth always and forever hurts!
— nitesh rane (@NiteshNRane) May 17, 2022
“वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाहिला आहे. पण, चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला “सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.” शालिनी ठाकरे यांनी ट्विट केले आहे की, “कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला…..!!! सच हमेशा कडवा होता है…….!!!! मानो या न मानो….!!!!”
Read also:
- “सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा
- शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा देऊन राज्यसभेतील उद्धव ठाकरेंचा डाव गुंडाळला?
- आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात, थोडक्याच बचावले जगताप
- कार्ती चिंदमबरम यांच्या तब्बल 11 ठिकाणी सीबीआयचे छापे; चिंदमबरम यांच्या अडचणीत वाढ
- संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर; शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा