मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या जागेसाठी चार प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असून तसे झाल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यासाठी एक अटही ठेवली आहे. राष्ट्रवादीची एक जागा निवडून आल्यानंतर राहिलेली मते छत्रपती संभाजीराजेंना देणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
“संयम बाळगतो म्हणून आम्ही नामर्दांची औलाद नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
यावरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, राज्यसभेसाठी अन्य राजकीय पक्ष आणि आमची या संदर्भात अजून काही चर्चा झाली नाही. आमच्याकडे एक उमेदवार निवडून आल्यानंतर उरलेली 10 ते 12 मते आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना देणार आहोत.
दरम्यान, या जागेसाठी कडव्या शिवसैनिकाच्या नावाची चाचपणी होत असतानाच शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीचे गणित सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात रविवारी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या चर्चेनंतर पवारांच्या खेळीने उद्धव ठाकरेंचा डाव गुंडाळला गेल्याची चर्चा सुरु आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेने फिल्डिंग लावल्यानंतरही पवार यांच्या खेळीमुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीतील सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याचे ठाकरे यांनी अधिवेशनात पक्षाच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांपुढे जाहीर केले होते. मात्र आता असे होणे शक्य नसल्याचे दिसते.
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी केलेल्या संभाजीराजे यांना शरद पवारांची साथ मिळाल्याने त्यांना बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा दिल्यास शिवसेना दुसऱ्या जागेवर लढू शकत नसल्याचे चित्र आहे.
“तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
तसेच राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. यात ठाकरे हे दोन्ही काँग्रेसवर मात करण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. परिणामी, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
Read also:
- आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात, थोडक्याच बचावले जगताप
- कार्ती चिंदमबरम यांच्या तब्बल 11 ठिकाणी सीबीआयचे छापे; चिंदमबरम यांच्या अडचणीत वाढ
- संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर; शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा
- शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुणे.. राज ठाकरेंची तोफ आता कोणावर धडाडणार?