अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले आहेत.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, अन् महाराष्ट्रवर आक्रमक होताहेत; राऊतांनी भाजपला सुनावलं
जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असे आमदार जगताप म्हणले. या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले.
गाढवांना लाथ मारण्याआधीचं त्यांना आम्ही सोडलं; मुख्यमंत्र्यांनी भाजपला डिवचलं
दरम्यान, मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला.
“हिंदुत्व आमचा श्वास अन् मराठी आमचा प्राण” मुख्यमंत्र्यांचं मुंबईत जोरदार भाषण
जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.
Read also:
- संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर; शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा
- शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुणे.. राज ठाकरेंची तोफ आता कोणावर धडाडणार?
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- नाना पटोलेंची राष्ट्रवादीविरोधात तक्रार; भाजप नेते म्हणाले की, “नाना पटोलेंचं वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण”