मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडच्या काळात भाजपच्या जवळ जाणारी भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.
‘ओ खैरे व्हा आता बहिरे’; कारण मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करत नाही
राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून देऊ नये. त्यांची ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवत चालली आहे. ती त्यांनी जपली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार, मेधा सोमय्या दाखल करणार मानहानीचा दावा
यावेळी रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले. उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झाल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. रोहित पवार यांनी या टीकेचे समर्थन करताना म्हटले की, उद्धवजी हे राज ठाकरे यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा ते त्यांच्या जास्त जवळ राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहिती असाव्यात. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
“जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून रोहित पवार यांनी राज्य पातळीवरील भाजप नेत्यांना लक्ष्य केले. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे. आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये. या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
Read also:
- “हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी आदर ठेवावा”
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका