पुणे : शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे. असा हल्लाबोल भाजप नेते केशव उपाध्यय यांनी शरद पवार यांच्यावर चढवला. मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस अनेक गंभीर आरोप देखील केलेत.
क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगुस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्याव. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनचं पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली.
“शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडूनच अशा प्रकरणातील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पोलीस यंत्रणेस वेठीला धरून सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटिल डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे. असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.
“यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. . तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालायने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे.
Read also:
- “दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका