सातारा : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी निवडणुक कार्यक्रम देखील निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रात या सहा जागांसाठी चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे, कारण की, विधानसभेतील सदस्याच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच सहजपणे निवडणून येतील. सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे हे अपक्ष म्हणून निवडणुक लढणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनी राजकीय पक्षांना खुलं पत्र लिहून आवाहन केलं आहे.
ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळवणे शक्य आहे. उर्वरित एक जागेकरीता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेरे संख्याबळ नाही. या जागेकरीता अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन संभाजी राजे यांनी राजकीय पक्षांना केलं आहे.
‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
2007 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत राजकारणात विरहित कार्य करीत आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता. सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केलं असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्रा या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत झटप राहिलो. जनकल्याणाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदारकीच्या कारर्किदीत माझ्या लक्षात आले. यामुळे राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर दावा करीत आहे. याकरीता मला आपणा सर्वाच्या मतदीची आवश्यकता आहे. असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की..”; चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
- शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- “दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे