मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा नोटीस बजावूनही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हजर झालेले नाहीत. ईडीच्या नोटिशीविरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांना मोठा झटका बसला आहे.
राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेही मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली. देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीकडून आतापर्यंत देशमुख यांना पाच समन्स बजावण्यात आले आहेत. पण देशमुख एकदाही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झालेले नाहीत.
Bombay High Court rejects former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's petition challenging the Enforcement Directorate (ED) summons for him to appear before the agency. pic.twitter.com/vzNm4LGG8o
— ANI (@ANI) October 29, 2021
या समन्सला देशमुखांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ही याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आतातरी देशमुख ईडीसमोर हजर राहणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, ईडीने पाठवलेलं एक समन्स खुद्द देशमुख यांनी स्वीकारलं होतं. तर इतर समन्स कुटूंबीय व वकिलांनी स्वीकारली आहेत. पण ते एकादाही जर न झाल्याने न्यायालयानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ईडीनं न्यायालयाकडं केली आहे. या मागणीवर मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांना समन्स बजावले आहे.
काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादी नेत्यांचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची फटाकेबाजी
दरम्यान, अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयानेही ऑगस्ट महिन्यात दणका दिला आहे. सक्त वसुली संचालनालयाला आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. देशमुखांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने तिसरे समन्स बजावल्यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यानुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.खानविलकर, कृष्णा मुरारी आणि व्ही.सुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Read Also :
- गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी
- मोर्चा कसा काढतात याची भाजपने प्रॅक्टीस करावी; गुलाबराव पाटलांचा टोला
- गृहमंत्री तुमचाच आहे, ”करा न काय करायचयं ते”; भाजप आमदाराचं नवाब मलिकांना चॅलेंज
- मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? – छगन भुजबळ
- क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? – संजय राऊत