जळगाव : भाजप’ एक नोव्हेंबरला ज्या मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मोर्चा काढत आहे. त्यातील सर्व मागण्या शासनाने पुर्ण केल्या आहेत. त्यांच्या मोर्चाला अर्थ नाही. मात्र भाजपने मोर्चा जरूर काढावा. मोर्चा कसा काढतात याची प्रॅक्टीस भाजपने करावी. विरोधी पक्ष आहे तो त्यांचे काम त्यांनी केले पाहिजे, असा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना टोला लगावला.
बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
विकास कामे करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आज जिल्हा नियेाजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, की पुढील वर्षाच्या विकास कामांची आखणी त्यात करण्यात आली. पूर्व नियोजीत बैठक घेतल्याशिवाय विकास कामांना गती येणार नसल्याने बैठक झाली. नियेाजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना मिळालेला निधी खर्च करण्याचा स्पीड कमी होता. कोरोनच्या कामांमुळे तो कमी झाला. मार्चपर्यत तो स्पीड वाढलेला असेल. नियोजन सर्व कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मी दिल्या. त्यांनीही त्या मान्य केल्या आहेत. २५ दिवसांत सर्व अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत जावून बैठक घेवू.
कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल
जळगाव जिल्हयाचा अतीवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या मदत यादीत सामावेश नसल्याबाबत भाजप’ने कांगावा केला होता. कालच मी कॅबिनेटच्या बैठकीत बसून अतीवृष्टीग्रस्तांच्या मदत यादीत जळगावचे नाव टाकून घेतले आहे. जिल्ह्यात नुकसान झाले असेल अन त्यात जळगावचे नाव नसेल असे होणार नाही. ‘गुलाबराव पाटील’ येथे बसला आहे. जळगावचे नाव वगळण्याची कोणाची हिम्मत ?
Read Also :
- गृहमंत्री तुमचाच आहे, ”करा न काय करायचयं ते”; भाजप आमदाराचं नवाब मलिकांना चॅलेंज
- मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? – छगन भुजबळ
- क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? – संजय राऊत
- काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादी नेत्यांचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची फटाकेबाजी
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला