पुणे : मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे की त्यांनी काहीच केलं नाही असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे. बहुचर्चित असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहे, याबाबत समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याच प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की त्यासोबत समीर वानखेडे यांच्या आई लाडाने त्याच्या वडिलांना दाऊद हाक मारायच्या यावरही भुजबळ यांनी मिश्किल शब्दात टिप्पणी केली आहे.
आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
भुजबळ म्हणाले की, मी पहिल्यांदा ऐकलं की लाडाने दाऊद म्हणतात, आमच्याकडे अहो जा हो, मुन्नू ,टून्नू अशी हाक मारतात, तसेच या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का, तसेच समीर वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन भारत सरकारला फसवलं आहे का? या सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच असंही भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणत आहेत त्यामुळे सत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असंही भुजबळ यावेळी म्हणालेत.
Read Also :
- क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? – संजय राऊत
- काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादी नेत्यांचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची फटाकेबाजी
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
- कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला