जालना : ST नसती तर माझं शिक्षण झालं नसतं. परिवहन महामंडळाचा आर्थिक कारभार डबडबाईस आला आहे. एसटी कर्मचारी करत असलेला संप योग्यच असून ST कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी राज्य सरकारकडून संप मोडून काढण्याची भाषा अयोग्य आहे.
संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज – गोपीचंद पडळकर
सध्या भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आहे मात्र त्यांच्या काळात देखील त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला होता असा टोलाही राजू शेट्टी यांनी भाजपला हाणला आहे. ते जालन्यातील मंठा येथे पत्रकारांशी बोलत होते.
कंगनाने देशाचा अपमान केलाय, लाज लज्जा असेल तर तिने माफी मागावी – संजय राऊत
अतिवृष्टीच अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे असंही ते म्हणाले. केवळ घोषणा करायच्या आणि पीकविमा कंपन्यांना मोकाट सोडायचं असं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसह राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यात मोठे अधिकारी देखील सहभागी आहे.पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य यात सहभागी असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटलंय.
Read Also :
- अनिल देशमुखांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला: अधिकाऱ्यांकडून छळवणूक केली का? देशमुख म्हणतात…
- राज्यात ‘बिगबॉस’चा शो, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली काय माहिती – पंकजा मुंडे
- पिंपरी-चिंचवड भाजपाचा किल्ला अभेद्य; ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी
- कंगना रनौतचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घ्या, गुन्हा दाखल करा; नवाब मलिकांचा हल्लाबोल
- भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप