पणजी : गेल्या विधानसभा निवडणूकीत पण गोव्याच्या जनतेने आप आदमी पक्षाला नाकारले होतं. आपच्या दिल्लीत काय परिस्थिती आहे, हे लोकांना माहीत आहे. भाजपने गोव्याला स्थिरता दिली. मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे, असे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि एमजीपीचे अक्षरशः वस्त्रहरण करून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर पक्ष केवळ भाजपशी संघर्ष करत आहेत. या पक्षांचा इतिहास पाहा. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलं. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात काँग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्यांना सत्ता केवळ यासाठी हवी (बोलत असताना माईक बंद झाला. फडणवीस म्हणाले भाई हमारी आवाज कोण बंद कर सकता है यार) केवळ लुटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवं आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासहार्यता संपल्याचा आरोप त्यांनी केला.
म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
फडणवीस म्हणाले, तृणमूल गोव्यात आली. त्यांनी एमजीपीसोबत आघाडी केली आहे. टीएमसीने ज्या पद्धतीचं राजकारण केलं आहे. त्याला गोव्याने नाकारलं आहे. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवशावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे, अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने दाखवल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही, पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही सुटेबल पार्टी वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत. काही एमपीजीपी नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आणि काहींनी भाजपमध्ये पक्ष सोडला. ही युती लोकांना भावली नसल्याचा दावा त्यांनी केला.
Read also:
- शिवसेना खचवून राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा घाट घातला जातोय; आमदार योगेश कदमांचा घरचा आहेर
- गोव्यात शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही; खासदार संजय राऊतांचा विश्वास
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच; खासदार संजय मंडलिकांच्या घोषणेने काँग्रेस चिंतेत
- राज्यातील नगरपंचायतीचा निकाल म्हणजे राष्ट्रवादीची भरभराट तर शिवसेनेची पीछेहाट; दरेकरांचा सेनेला टोला
- ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ