मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला होता. यामध्ये काही ठिकाणी मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता नगरपंचायतीचे सगळे निकाल हाती लागले आहेत. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत असं भाजपच्या काही मोठ्या नेत्याचं म्हणणं आहे. भाजपचेच सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
दुसऱ्या बाजूला दरेकर यांनी शिवसेनेला डिवचण्याचं काम केलं आहे. शिवसेनेची महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून प्रगती तर नाहीच मात्र अधोगतीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या नरगरपंचातीच्या जागा खूप कमी निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र पुरेपूर फायदा झाला असून राष्ट्रवादीच्या नागरपंचातींच्या जागांमध्ये यावेळी कमालीची वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाला देखील कमी जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
भाजप राज्यात विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. एकटी निवडणूक लढवत आहे तरी भाजपाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत. काही नेत्यांच्या वर्चस्व असलेल्या ठिकाणी मतदारांचा सत्ताधाऱ्यांचा विरोधात कल दिसतो आहे. नगरपंचायतीचा निकाल म्हणजे शिवसेनेची पीछेहाट तर राष्ट्रवादीची भरभराट असा काहीसा प्रकार सध्या सुरु आहे,असा टोमणा प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला मारला आहे.
Read also:
- ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
- म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
- यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे
- राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार
- राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व