मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणांवर इडीने धाड टाकली. त्यानंतर इडीने त्यांची तब्बल 13 तास चौकशी केली. तपासातून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र इडीचा ससेमिरा अनिल परबांच्या पाठीमागे कायम आहे. अशातच पुन्हा एकदा भाजपनेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा
अनिल परब तुम्ही 2019 मध्ये दापोली ग्रामपंचायतला साई रिसॉर्टबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात 16,800 फुट साई रिसॉर्ट तुमच्या मालकीचे आहे. आता तुम्ही मीडियाला सांगत आहात की, तुमचा साई रिसॉर्टशी काही संबंध नाही. मग हा रिसॉर्ट कुणाचा आहे. त्याबाबत उत्तर द्या. असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
“मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
शिवसैनिकांना वाटतं की इडी गटारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेली होती. संजय राऊत आणि अनिल परब काय बोलतात याला आता काही महत्व नाही. शिवसेनेनेच मुंबई महापालिकेचं गटार केलं आहे. इडी ग्रामपंचायतीत गेली. 4 तास त्यांनी तपास केला. त्यांच्या हाती अनिल परब यांचं 26 जून 2019 चं पत्र लागलं आहे. त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही, असंही सोमय्या म्हणालेत.
“उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या तुरूंगात आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर हा अनिल परब यांचा लागतो की, काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच याप्रकरणाबाबत किरीट सोमय्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
- माझ्या वडिलांचा आदरच करतो, ते जे बोलले त्यावर..; शाहु महाराजांच्या वक्तव्यवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया
- पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
- “इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
- “राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”