सोलापुर : गेल्या काही दिवसापासून उजनी धरणाच्या पाण्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. उजनी धरणाचं पाणी बारामती आणि इंदापुरला पळवण्यात येत असल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आज राज्यमंत्री आणि सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत भाष्य केलं.
“उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
उजनी धरण्याच्या पाणी प्रश्नावरून जिल्ह्याचा पालक मंत्री बदलण्याची मागणी होत आहे. असा प्रश्न पत्रकारांनी दत्तात्रय भरणे यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, पालकमंत्री हा बाजारातला भाजीपाला आहे का? की तो केव्हाही बदलण्यात येईल, असं खोचक प्रतिक्रिया यावेळी दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली.
“सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
सोलापुरकरांना चार चार दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही. याबद्दल मला शोकांतिका आहे. येणाऱ्या काळामध्ये उजनी धरणातून पाण्याबाबत जी समांतर योजना आहे. त्याचं काम पुढच्या 10 ते 15 महिन्यात पुर्ण करण्यात येईल, तसेच पुढच्या वर्षी विद्यापीठामध्ये अहिल्याबाई होळकर यांचं 14 फुट उंचीचं स्मारक उभं करणार आहोत. तसेच वाहतुकीचा प्रश्न देखील मार्ग लावणार आहोत. असंही ते म्हणाले.
“यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, मागील काही दिवसापासून उजनी धरणाच्या पाण्यावरून जोरदार संघर्ष बघायला मिळालं. उजनी धरणाचं पाणी हे बारामती आणि इंदापुरला पळवलं जात असल्याचा आरोप करीत आपच्या काही नेत्यांनी याविरोधात आंदोलन देखील केलं होतं. त्यामुळे राजकीय वातावरण चागलंच पेटलं होतं.
Read also:
- “इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
- “राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
- पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा
- “मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
- “हे दोन पैशाचे पोस्टर अन् आमचं तीन लाखाचं पोस्टर”; एकाच मंदिरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणा