कोल्हापुर : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजी राजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्व:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. त्यामुळे शिवसेनेने मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं आहे. संभाजीराजेंना अपक्ष उभं राहायचं असेल तर इतरांना भेटणं गरजेचं होतं. अस वक्तव्य शाहू महाराजांनी केलं आहे. त्यावर आता संभाजी राजे यांनीही वक्तव्य केलं आहे.
“मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. पंरतु त्यांनी वैयक्तीक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही,असंही शाहू महाराज म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
शाहु महाराजांनी आपली भूमिका मांडल्यानंतर संभाजी राजे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कोणताही राजकीय पक्ष पाठिंबा देत नसल्याने निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेत आहे. असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने विश्वास घात केला असल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला. तसेच शिवसेनेने शब्द फिरवला असल्याचंही ते म्हणाले होते. त्यावर आता शाहू महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read also:
- माझ्या वडिलांचा आदरच करतो, ते जे बोलले त्यावर..; शाहु महाराजांच्या वक्तव्यवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया
- पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
- “इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
- “राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
- पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा