मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या ३० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तर १० जून रोजी मतदान होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये पाच जागांचा प्रश्न सुटला आहे. मात्र सहावी जागा कुणाला जाणार त्याचा गुंता अजूनही सुटलेला नाही. खासदार संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये चिलबिचल सुरू आहे.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
संभाजी राजे यांना राज्यसभेच्या तिकीटावरून सध्या शिवसेना आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजी राजे शिवसेनेत आले तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ, अशी भूमिका संभाजी राजे यांनी घेतली आहे. त्यावरून भाजपचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संभाजीराजे सध्या भाजपकडून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना खासदारकी देताना भाजपनं कोणत्याही अटी घातल्या नव्हत्या. छत्रपती संभाजीराजेंसमोर अटी, शर्टी ठेवणं योग्य नाही. छत्रपतींच्या वारसांना अटींच्या चौकटीत बसवणं ठीक नसल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
शिवसेनेत प्रवेश करा. मग राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत विचार करू, असं शिवसेनेकडून संभाजीराजेंना सांगण्यात आलं आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढा, पक्षाच्या सभांना उपस्थित राहा, निवडणुकीत प्रचार करा. अशा अटी शिवसेनेकडून ठेवण्यात आल्या आहेत. असंही प्रवीण दरेकर म्हणालेत.
“एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, विधानसभेच्या संख्याबळानुसार सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, आणि काॅंग्रेस प्रत्येकी एक जागा निवडून आणू शकते. तर विरोधी पक्षाला दोन जागा मिळताहेत. मात्र सहावी जागेसाठी प्रत्येक राजकीय पक्षाला अधिक मताची गरज आहे. या जागेवर अपक्ष म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच राजकीय पक्षांना त्यांनी आव्हान देखील केलं होतं. यावर आता येणाऱ्या काळात कशापद्धतीच्या घडामोडी घडणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे
Read also:
- “मुंडे साहेबाचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारमध्ये पुर्ण करता आलं”; धनंजय मुंडे
- “हा जमलेला महासागर सांगतो की शेतकऱ्यांना या मुर्दाड सरकारविरोधात चीड”
- नवाब मलिक प्रकरणांवरून फडणीस संतापले; म्हणाले.. की, जेवढा अट्टाहास मलिकांना वाचवण्यासाठी…;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
.