मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त हिंदुत्वाचे वातावरण होईल असं जोरदार भाषण केलं. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमानचलीसा ऐकवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. मनसे प्रमुख राजे ठाकरेंना या भाषणाविषयी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून चांगलाच पाठींबा मिळाला तर शिवसेना, राष्ट्रवादीने त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने टीका केली. राज ठाकरे यांनी भाषणात जे काही मुद्दे मांडले आणि शिवसेनेविषयी जे काही सांगितलं ते सगळं सत्य आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली. यानंतर आता भाजपच्या मित्रपक्षांनीही मनसे प्रमुख राजे ठाकरेंच्या भाषणाची वाहवा केल्याचे चित्र समोर आले आहे आणि सगळीकडं राज ठाकरेंच्या भाषणाची चर्चा रंगलीय.
“मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य
राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला जे काही भाषण केलं ते महाविकास आघाडी सरकारची लखतरे वेशीवर टांगणारं होतं हे मात्र नक्की. राज ठाकरेंनी हे सरकार अस्तित्वात आल्याबद्दल एक वाक्य वापरलं होतं की पळून एकासोबत जायचं आणि लग्न दुसऱ्यासोबत करायचं. त्याऐवजी माझ्या मताप्रमाणे आपण म्हणू शकतो की लग्न एका सोबत केलं आणि संसार थाटला दुसऱ्या सोबत. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही शोकांतिका झालीय. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मात्र काही बेईमानी लोंकांमुळे हे दिवस पाहावे लागतायंत असं देखील विनायक मेटेंनी म्हटलंय.
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे
भाजपच्या अन्य काही नेत्यांनीही याबाबत राज ठाकरेंची प्रशंसा केलीय. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. आगामी काळात प्रमुख महानगरपालिका म्हणजेच मुंबई, ठाणे आणि नाशिकसह, औरंगाबाद,कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूका येऊन ठेपल्यात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या सर्वंच महानगरांमध्ये जनाधार आहे.
भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
या पार्श्वभूमीवर राज यांनी भाजपशी हात मिळवणी करावी म्हणूनच भाजपसह भाजपच्या मित्रं पक्षांनीही राज यांच्या भाषणाची स्तुती करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जातेय. भाजप आणि मनसेची युती झाल्यास या महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल वेगळा लागू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे. आता पुढील निवडणुकांसाठी खरचं भाजप आणि महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना हातमिळवणी करणार का ? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिल्याची चर्चा संबंध महाराष्ट्रात रंगलीय.
Read also:
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; मनसेकडून गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर
- “बाळासाहेबांचे विचार काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेना संपवत आहे”; नितेश राणे
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल