पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील भाषणात जर मशिदीच्या बाहेरील भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवा असं राज ठाकरे म्हणाले, यावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टिका केली आहे. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा अश्या प्रकारचे वक्तव्य केल्या जातात.एखादं सरड्या जसा रंग बदलतो तस माणसं रंग बदलत आहे. त्याचाच हा प्रकार आहे. अशी टिका यावेळी राऊत यांनी केली.
भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
पुण्यात पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक व गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. माझं विश्वास हे भारतीय संविधानावर आहे.जो संविधान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे.भारत देश हा विविध जाती,विविध भाषा मधील देश आहे.देश एक संघ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.कुठल्याही समाजाबद्दल बोलणं चुकीचं आहे.जातीयवाद करायची गरज नाही. असं देखील राऊत म्हणाले.
भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
पुण्यामधील हा पर्यायी इंथान परिषद उमेदीचा उपक्रम आहे.आम्ही हायड्रोजन वर काम करतो आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र उतरणार आहे.सर्व कंपनी बरोबर आम्ही चार्जिंग स्टेशन वर चर्चा करतो आहे.८५ पैसे दुचाकी आणि १ रुपयात चार चाकी इलेक्ट्रिक वर धावू शकते तर त्यामुळे कमी खर्चात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार आहे.असं देखील राऊत म्हणाले.
Read also:
- अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; मनसेकडून गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर
- “बाळासाहेबांचे विचार काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेना संपवत आहे”; नितेश राणे
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल
- “मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य
- राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे