मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दिवसांचा कोकण दौरा केला होता. या दौऱ्यावरून भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दैनिक सामनातील एका बातमीचा संदर्भ देत शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये, असा खोचक सल्ला अतुल भातखळकर यांनी सामनातील एक बातमी शेअर करत दिला आहे.
सामनामध्ये या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मंत्रालयातच ठाण मांडणार अशा आशयाची बातमी बातमी छापून आली होती. ही बातमी शेअर करत अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात @OfficeofUT घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा…
सामानाची बातमी…
'यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.'मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये.@rautsanjay61 😂 pic.twitter.com/7Hda1T7EUw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 26, 2021
संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मारून बसलेले होते हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा. सामनाची बातमी…यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार. मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये, असा खोचक टोला भातखळकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
Read Also :