नागपूर : मुंबईतील काही भागात ज्या पद्धतीचा तुटवटा जाणवत आहे, तसाच प्रकारचा पाण्याचा तुटवटा हा घाटकोपर पश्चिम मतदार संघातील काही डोंगराळ भागात आहे. लोक लोकप्रतिनिंधीना निवडून देतात, परंतु त्यांचा पाण्याचा प्रश्न अजूनही सोडवलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत त्याठिकाणातील लोकांना जोपर्यंत मुलबक पाणी मिळत नाही. तोपर्यंत डोक्यावरील केस कापणार नाही, अशी शपथ भाजपचे आमदार राम कदम यांनी घेतली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
महापालिकेतील काही निष्काळजीपणामुळे तेथील लोकांना या समस्यांना समोरं जावं लागत आहे. त्यामुळे आता आमचं सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करून तो विषय योग्य मार्गी लावणार आहे. परंतु त्याआधी माझ्या स्वत:ची नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्याआधी राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेत शिवसेनेची मागील काही काळापासून सत्ता आहे. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे येथील लोकांना पाण्याची समस्या असल्याचीही टिका त्यांनी केली आहे.
Read also
- घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
- चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
- “अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
- फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
- निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय