मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नवे राष्ट्रपती आहेत. असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. मंगळवारी नागपुरात अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
त्यावर आता त्यांना एका जुन्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला होता. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे. असंही त्या म्हणाल्या.
“भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
मी स्वत: हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही. मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे जे जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. असंही त्या म्हणाल्या.
“आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांना विचारले असता. ते म्हणाले की, मी निशब्द आहे या सगळ्यावर. नवीन नवीन ज्या भुमिका येत आहेत. त्यावर मी नि: शब्द झालो आहे. मला सुचत नाही या विषयावर काय बोलावं ते. यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच बोलतील. मी यावर बोलणं योग्य नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती…! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
- “मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका
- “संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी
- TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
- पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले