नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील त्यांच्या विधानसभेत सीमावादाचा मुद्द्यावर भाष्य केलं. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा विधान केलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट ही फक्त कायदा व सुव्यवस्थेसंबंधी होती. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्नासंद्रभात नव्हतीच तर केवळ कायदा- सुव्यवस्थेसंदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”
कर्नाटकच्या मुख्य्मंत्र्यांनी विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात. ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राचे नेते ज्याप्रमाणे घाबरून आहेत, त्याप्रमाणे घाबरत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या नेत्यांना जो केंद्रीय सपोर्ट नाही तो छुपा केंद्रीय सपोर्ट त्यांना आहे किंवा येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने ते भावनिक विषय छेडून आपली बाजू भक्कम करत आहेत. पण ते काही असो महाराष्ट्र मात्र महाराष्ट्र सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही, हे बोम्मई यांनी लक्षात घ्यायला हवे. असंही ते म्हणाले.
Read also
- “संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी
- TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
- पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले
- मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
- “भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर