नागपूर : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेतील टीईटी गैरप्रकाराचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेत आला. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा विषय चर्चेत आणणा याची मागणी केली. परंतु हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर चर्चा करता येणार नाही. असं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सांगितलं. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला.
“महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभुषण सिंह मुंबईत येणार, पाठपुरावा करतेय,”
सुरूवातीलाच अजित पवार यांनी हा मुद्दा उचलून धरला. यावर आपण चर्चा करायला हवी. परंतु त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतांना हा प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना यावर चर्चा करता येणार नाही. असं सांगितलं. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेच्या कामकाजात राखून ठेवावा, अशी मागणी लगेचच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी केली. त्यावर थोडा गोंधळ झाला.
गोपीचंद पडळकरांच्या मोताश्री विजयी, गोपीचंद पडळकरांचा थेट फोन
त्यावर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंच्या मताशी सहमतीने हा विषय राखून ठेवला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. टीईटी घोटाळ्यात, मंत्री, आमदार, अधिकारी यांची मुल नातेवाईक याबाबत विरोधकांनी प्रश्न विचारले. त्यावर सरकारने उत्तर देण्याचं टाळलं. त्यावरून थोडा गोंधळ झाला.
भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ
मागील काही महिन्यात टीईटी परिक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ७ हजार ८७४ उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासासह त्यांना पुढील टीईटी परिक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला. त्यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यावरून आज विधानसभेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला.
Read also
- पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले
- मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
- “भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
- “आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
- “भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”