नागपूर : महाविकास आघाडीचा मोर्चा हा नॅनो मोर्चा होता. अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचा मोर्चा नॅनो नव्हता तर फडणवीस साईज होता. असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
महापुरूषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, अशा अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. यावरून फडणवीस म्हणाले की, यांचा मोर्चा अयशस्वी झाला आहे. आम्ही त्यांना आझाद मैदान घेण्याची विनंती केली होती. पण त्यांना माहित होतं की, मोर्चात कुणी येणार नाही, म्हणून त्यांनी छोट्याशा साईजमध्ये तो मोर्चा घेतला. एकंदरीत त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा होता. अशी टिका फडणवीसांनी केली होती.
“2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल
त्यावर अधिवेशनाच्या धुमचक्रीत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला हाणला आहे. त्यावर पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना यांना फडणवीसांच्या टिकेबाबत विचारले असता. त्यांनी एका वाक्यात फडणवीसांवर प्रहार केला. तसेच नागपुर येथील हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे सध्या नागपूरात आहेत.
Read also
- “भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”
- “महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभुषण सिंह मुंबईत येणार, पाठपुरावा करतेय,”
- गोपीचंद पडळकरांच्या मोताश्री विजयी, गोपीचंद पडळकरांचा थेट फोन
- भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ
- “खुद्द उर्जामंत्री बोलत असताना सभागृहात बत्ती गुल..! बल्ब, माईक सभागृह शांत