सिंधुदुर्ग : राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. आज ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहे. राज्यभर ठिकठिकाणी गुलाल उधळून आनंद साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचेही घटना घडल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यामध्ये दगडफेकीत गंभीर झालेल्या धनराज माळी नावाच्या २५ वर्षीय भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जामनेरच्या उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी आणि प्रंचड आक्रोश या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
ग्रामपंचायतीच्या मतदानापुर्वी नितेश राणे यांनी नांदगावामधील गावकऱ्यांची सभा घेतली होती. सर्व राज्यातील मंत्री, आमदार, हे मला विचारूनच गावासाठी निधी देत असतात. त्यामुळे माझ्या विचाराचा जर सरपंच निवडून आला नाही तर गावाला एक रूपायाही देणार नसल्याची धमकी नितेश राणे यांनी गावकऱ्यांना दिली होती. त्यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राणेंवर जहरी टिका केली होती. मात्र या ग्रामपंचायतीवर आता नितेश राणे यांचा उमेदवार विजयी झाला आहे.
“नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
यादरम्यान काळात भाजपचे नेते नितेश राणे यांच्या मतदार संघातील नांदगाव ग्रामपंचयात चर्चेत आली होती. आपल्या विचाराला सरपंच आला नाही तर एकही रूपयाचा निधी देणार नसल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती. त्याचा निकाल आता लागला आहे. नितेश राणे यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचा गड राखला आहे.
दरम्यान, राज्यातील ४७१५ ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये भाजप आणि शिंदे गटाकडे २००६ तर महाविकास आघाडीकडे १८६८ ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. तर भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर विजयी दावा ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Read also
- “2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल
- भीक मागणं हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..! ठाकरेंशी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं
- “पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
- “भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास