पुणे : महात्मा फुले, क्रांती ज्योतीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असलेल्या भिडेवाड्याची दुरवस्था झाली आहे. स्त्री शिक्षणाचा पाया ज्या वास्तूत रचला तिची दुरवस्था, होणं, हे योग्य नाही. हा विषय घेऊन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन वाड्याचं संवर्धन व विकास करण्यासाठी निधी द्यावा आणि त्या ठिकाणी पुन्हा मुलींची शाळा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
1 जानेवारी 1848 साली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळी सुरू केली. महात्मा फुलेंच्या कार्यकर्तृत्वाने शिक्षण घेण्याची संधी महिलांना मिळाली आणि त्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. असं निवेदनात रोहित पवारांनी नमुद केलं आहे.
शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत
तसेच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी प्रगती केली आहे. पण स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेला भिडे वाड्याची मात्र दुरावस्था झालेली आहे. बुधवार पेठेतील हा वाडा गेली कित्येक वर्षापासून अखेरचा घटका मोजत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली आहे.
“अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
त्या वास्तुची आजची अवस्था दुर्दैवाने फार खराब आहे. सदर ठिकाणी पुन्हा गरीब मुलींसाठी शाळा सुरू होणेबाबत जनसामान्यातून मागणी होत आहे. तरी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाठी निधी उपलब्ध करून पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्याची यावी अशी विनंती केली आहे.
Read also
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास
- सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
- “नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
- राज्यात 590 ग्रामपंचायती बिनविरोध..! भाजपकडे सर्वाधिक, तर शिंदे गटाकडे 103, राष्ट्रवादी, ठाकरे, काॅंग्रेसकडे किती?
- “राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”