नागपूर : राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मत मोजणी सुरू झाली आहे. तर जवळपास 590 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध म्हणून झाल्या आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश प्राप्त झालं आहे. तर शिंदे गट भाजपच्या खालोखाल आहे. यातच महाराष्ट्रात रेकार्ड ब्रेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर एकच पक्ष राहणार आहे. यावेळीच भाजप रेकार्ड ब्रेक ग्रामपंचायतीच्या जागा मिळतील, तसेच महाराष्ट्रातील जनता ही भाजपच्याच पाठीमागे आहे. असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच कुणीही काही नरेटिव्ह तयार केला तरी त्याची काही काळजी करू नका. असंही ते म्हणाले.
“अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
मागच्या ग्रामपंचायतीच्या वेळी इतर पक्षांनी एक नरेटिव्ह तयार केला होता. त्यामुळे त्याची काळजी कुणीही करू नका. मागच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तेथील पदाधिकाऱ्यांनी आम्ही भाजप सोबत असल्याचं पत्र लिहून समर्थन दिलं होतं. त्यामुळे याही वेळी जनता आपल्या पाठीमागे आहे. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
“संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
दरम्यान, आता हाती आलेल्या 695 ग्रामपंचायती निकालावरून भाजपच्या ताब्यात 175, शिंदे गटाकडे 112, राष्ट्रवादीकडे,126 काॅंग्रेसकडे, 71 तर ठाकरे गटाकडे 79 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही तासांत कुणाकडे किती ग्रामपंचायती ताब्यात राहणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
- “नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
- राज्यात 590 ग्रामपंचायती बिनविरोध..! भाजपकडे सर्वाधिक, तर शिंदे गटाकडे 103, राष्ट्रवादी, ठाकरे, काॅंग्रेसकडे किती?
- “राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
- महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल