मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अन् उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी आमच्या आमदारांची सर्व कामे रोखण्यात आली. त्यावेळी माझ्या स्वत:च्या मतदार संघातील कामं तुम्ही स्वत: रोखली होती. असा आरोप करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
“नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
हिवाळी अधिवेशनाचं आज दुसरा दिवस असून आज सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर आघाडीचे अनेक कामे रोखली गेली आहेत. असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर फडणवीस यांनी आघाडीला जशाच तसं प्रत्युत्तर दिलं.
मागील अडीच वर्ष भाजपच्या एकाही आमदाराला एक नवा पैसा आघाडी सरकारने दिला नाही. परंतु आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही. याठिकाणी जाणूनबुजून ज्याठिकाणी 70 स्थिगिती दिल्या होत्या. त्या आम्ही उचलल्या आहेत. परंतु 30 टक्के स्थिगित्या यासाठी ठेवल्या आहेत की, त्यामध्ये तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आला नाही.
“राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
ज्या ठिकाणी 2 हजार कोटीची तरतुद आहे, तिथे सहा सहा हजार कोटी रूपये वाटलेले आहेत. हे पैसे आणायचे कुठून असा सवाल करत आमदानी अठाणी आणि खर्चा रूपया. कशापद्धतीने हे बजट मंजूर होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तरीही तुमच्यावर आम्ही अन्याय करणार नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान, फडणवीस ज्यावेळी उत्तर देण्यास उभं राहिले, त्यावेळी विरोधकांनी इडी सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला आहे.
Read also
- भीक मागणं हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..! ठाकरेंशी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं
- “पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
- “भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास
- सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित