मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून त्यांची सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. तसेच, त्यांच्यावर सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडूनही चौकशीची टांगती तलवार आहे. यातच देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची अचानक सीबीआयने २० मिनिटे चौकशी केली, तर वकील आनंद डागा यांना अटक केली.
देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून, “देशमुखांच्या जावयाला कायद्यानेच चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, याची माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप मलिकांनी केला. पण ज्याप्रकारे तुम्ही नारायण राणेंना अटक वॉरंट न दाखवता ताब्यात घेतले. त्यावेळी कुठे होता कायदा? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट?” असं ट्विट केलं आहे.
काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य
दरम्यान, “‘देशात कायद्याचं राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे? देशमुखांची मुलगी, सुन, जावई आणि वकील निवासस्थानाबाहेर असतानाच अचानक १०-१२ जणांनी त्यांची गाडी अडवून, वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले. मात्र याची कुठलिही माहिती नातेवाईकांना दिली गेली नाही. त्यामुळे, ही कारवाई बेकायदेशीर असून, सीबीआयने या प्रकरणाचा तात्काळ खुलासा करावा,” अशी मागणी केली होती.
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाने केली अडचणीत वाढ
दुसरीकडे, या घटनेने राज्यातील वातावरण तापलेले असतानाच, सुप्रीम कोर्टाने देशमुखांना दणका दिल्यांनतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील देशमुखांच्या अडचणीत वाढ केली आहे. ईडीच्या कारवाईविरोधात देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितीला होती. मात्र, उच्च न्यायालयाने मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Read Also :
- उद्धव ठाकरेंचा झटका: मंत्रालयातील ३०० ‘पॉवरफुल्ल’ एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या
- महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
- “शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
- “उघड दार उद्धवा आता…”; मंदीरे उघडण्यासाठी भाजपच्या शंखनादानंतर मनसेचे घंटानाद आंदोलन
- शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा – अजित पवार