मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधल्यानंतर भाजपा नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हिंदुत्वावरुन सध्या शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. यावरुन भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; नाना पटोलेंची जीभ पुन्हा घसरली
संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशी कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर असून समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असं म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता. नंतर हे ट्वीट संजय राऊत यांनी डिलीट केलं.
“बेटी बचाओ बेटी पटाओ” म्हणणाऱ्याचे पुतळे जाळणार का? नाना पटोलेंचा भाजपला रोखठोक सवाल
भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी संजय राऊतांच्या ट्वीटचा फोटो शेअर करत “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,” असं सुनावलं होतं.
नागपूरात स्टेजवर न्यूड डान्स, आर आर आबांच्या स्वप्नांना ठाकरे सरकारकडून तिलांजली – चित्रा वाघ
“ते ट्वीट हटवलं नाही, जिथे पोहोचवायचं तिथपर्यंत ते पोहोचवलं आहे. प्रमोद महाजन हे त्या चित्रात बाळासाहेबांसमोर उभे आहेत. भाजपाच्या युतीचा तो सुरुवातीचा काळ होता. काल महाऱाष्ट्रातील भाजपा नेत्यांनी शिवसेनेसंबंधी जी वक्तव्यं केली, त्यात सत्य काय होतं हे दाखवण्यासाठी आर के लक्ष्मण एक तटस्थ व्यंगचित्रकार होते. टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध केलेलं ते व्यंगचित्र होतं. त्यात इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नव्हतं. मी काही प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली नाही. तसं असतं तर त्यांनी त्यावेळीच ३५-४० वर्षांपूर्वी आक्षेप घ्यायला हवा होता. हे कार्टून उपलब्ध आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मनोहर पर्रीकर या तिन्ही कुटुंबांचं भाजपाच्या वाढीत फार मोठं योगदान आहे. पण त्यांची पुढील पिढी आता कुठे आहे? त्यांचं भाजपाशी काय नातं आहे हे पहावं लागेल”.
Read also:
- औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
- नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
- शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
- नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…
- “इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल