मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराजी अनेकदा उघडपणे समोर आली आहे. आता पुन्हा एकदा ‘हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही’, अशा स्पष्ट शब्दांत लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील चित्र स्पष्ट करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
दरम्यान, यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून, “नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?,” असा टोला लगावत म्हणत काँग्रेसला दोन सवाल केले आहेत.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, “नाना जी तुम्ही वाफा दवडवा.. इतर दोन सरकार चालवित आहेत..सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी? सरकारमध्ये कॅाग्रेसला विचारतय कोण? काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत एवढच काय
सोनिया गांधीनी पत्र लिहीले उपयोगतरी शून्य,” असं लिहीत त्यांनी काँग्रेसला छेडलं आहे.
@NANA_PATOLE जी तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालवित आहेत..सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी?
◾️सरकारमध्ये कॅाग्रेसला विचारतय कोण?
◾️काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत
एवढच काय
◾️सोनिया गांधीनी पत्र लिहीले उपयोगतरी शून्य— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 24, 2021
Read Also :