मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या ६ महिन्यांपासून अनेक मुद्द्यांवरून घमासान सुरू आहे. यातलाच एक राजकीय वर्तुळांत चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा.
यावरून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात वितुष्ट निर्माण झाले असून, राज्यपालांकडे आम्ही १२ जणांच्या नावांची यादी पाठवलेली आहे, मात्र राज्यपालांकडून यावर दिरंगाई होत असल्याची टीका ठाकरे सरकारने केली आहे, तर विरोधाकांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. @someshkolge यांनी ही माहिती #RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा
◾️पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का?
◾️तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का?
◾️मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का ?— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 2, 2021
यातच आता भाजपाने परत एकदा हा मुद्दा छेडला असून, आरटीआय उत्तराचा दाखला देत त्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत एक ट्विट केले असून, “त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता-प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे, मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?,” असे सवाल केशव उपाध्ये उपस्थित केले आहेत.
तसेच, “कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोळगे यांनी ही माहिती RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा… पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?,” असे प्रश्न विचारून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली आहे.
Read Also :
- ‘फडणवीस, महाजनांचे नाथाभाऊंशी चांगले संबंध, आहेत ते केवळ वैचारिक मतभेद’ – रक्षा खडसे
- ‘संजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल रोज काय बोलायचं’
- कोरोनाकाळातील स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांची आम्हाला जाण, समस्या सोडवणार – छगन भुजबळ
- रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करून मला ज्ञान शिकवू नका – प्राजक्त तनपुरे
- फडणवीसांना वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली, त्यांच्या वेदना मी समजू शकतो