मुंबई : राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात परत सत्तांतराच्या चर्चा सुरु झाल्या.
दरम्यान, पवारांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी, आधी भाजपत असणारे आणि आता राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे घर गाठले, यामुळे राज्यात आता लवकरच मोठा राजकीय भूकंप भाजप घडवून आणणार असे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, ‘विरोधीपक्षाने सरकारसोबत मिळून कामही केलं पाहिजे. त्यांना पुढची साडेतीन वर्ष टीकाच करायची आहे,’ असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना या भेटींवरून लगावला आहे.
तसेच, ‘फडणवीसांच्या वेदना मी समजू शकतो, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली, असा त्यांना वाटतं म्हणून ते टीका करत आहेत, मात्र त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील,’ अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
तसेच, ‘फडणवीस, शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन आले, हे पाहून मला खूप बरं वाटलं. विरोधी पक्ष हळूहळू का होईना जमिनीवर येत आहे, त्याचे हे द्योतक आहे. फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील,’ असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
Read Also :
- आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
- “गोलमाल हैं भाई, कुछ गोलमाल हैं”, आता एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीला
- ‘पक्षाला उतरती कळा लागू नये म्हणून भाजप, सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे’
- तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा