मुंबई – काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल देत लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आतापासूनच कामाला लागले आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला यावेळी सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. भाजपने सत्ताधारी शिवसेनेला सुरुंग लावण्यास सुरूवात केली आहे.
‘कोर्टाच्या चपराकींमुळे मुख्यमंत्री ठाकरेंचे दोन्ही गाल सुजले’; किरीट सोमय्यांचा चिमटा
मुंबईतील चारकोप विधानसभा क्षेत्रातील कांदिवली पश्चिम येथे गुरूवार रोजी भाजपचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आणि पक्षप्रवेश पार पडला. यावेळी कांदिवली पश्चिम मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश पेडणेकर, प्रकाश सैनी, आणि राष्ट्रवादीचे सुशील लांजेकर यांच्या सहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. हा पक्षप्रवेशाचा सोहळा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित पार पडला.
भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
दरम्यान, या शिबिराला मार्गदर्शन करताना नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असल्याचा दावा केला. यासोबतच शिवसेनेवर निशाणा साधला. आपण ज्या शिवसेनेवर प्रेम करत होतो आता ती शिवसेना संपली आहे. आता फक्त ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, जिकडे फक्त फायदा आणि नुकसानीचे गणित मांडले जातात. जुन्या शिवसैनिकांना काही दिले नाही. हिंदुत्व आणि शिवसेना यांच्यात काही संबंध राहिलेला नाही. आता मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यांना आपल्या हिंदुत्वाचे सर्टिफिकेट द्यावे लागत आहे. १४ मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार हे लोकांना सांगावं लागत आहे, अशी खोचक टीका राणे यांनी केली.
Read also:
- संभाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रमांच्या गाण्यावर थिरकले, शिवसेना आमदार संजय गायकवाड
- हिंदूजननायक शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’; शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिली नवी उपाधी
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिंदुत्वाच्या अग्नीशी खेळण्याचा प्रयत्नही करु नका”; अकबरूद्दीन ओवेसीला मनसेचा इशारा
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा