नवी दिल्ली – कधी कनिष्ठ, वरिष्ठ, कधी उच्च तर कधी सर्वोच्च न्यायालय, अशा सर्व न्यायालयांकडून सतत बसत असलेल्या चपराकींमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन्ही गाल सूजले आहेत. दोनच गाल आहेत त्यावर आणखी किती चपराक खाणार? अशी खोचक टीका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत मुक्कामी असलेल्या राणा दांपत्याची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
किरीट सोमय्या म्हणाले, “न्यायालयाने काल राजद्रोहाचे कलम तात्पुरते स्थगित केले. उद्धव ठाकरे सरकारने राणा दांपत्याविरोधात हेच कलम लावले असल्याने ठाकरे सरकारला यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा चपराक मारली आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानेही राणा दांपत्यावर लावलेले राजद्रोहाचे कलम योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आणखी किती वेळा आणि किती न्यायालयांकडून चपराक खाणार”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकट्याने लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही’
यावेळी सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनाही लक्ष्य केले. “मुख्यमंत्री ठाकरे हे संजय पांडे यांचा वापर माफियाप्रमाणे करत आहेत. मात्र न्यायालयाने सरकारला त्यांची जागा दाखवून दिली. आता ते माफिया पोलिस आयुक्त कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल आता सर्वोच्च न्यायालयाला जाब विचारा. आता न्यायालयाने राजद्रोहाचे कलम निरस्त केले. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही”, असेही सोमय्या म्हणाले.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
“माफियांना आम्ही धडा शिकवणार. माफियागिरीची ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. खासदार आणि आमदारांना धमकी देतात. २० फुट खड्ड्यात गाडण्याची भाषा फक्त माफिया सरकारमधील लोकच करू शकतात. मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून या सरकारच्या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. मी गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला
Read also:
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू