पुणे – सध्या राज्याच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर हा मुद्दा आणखीनच तापला आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी हिंदुत्व पुढे करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत थेट ठाकरे सरकारलाच ललकारले. तर दुसरीकडे जेव्हापासून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता मिळवली तेव्हापासून विरोधक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने डिवचत आहे. शिवसेनेने मात्र भाजपा-मनसेवर नकली हिंदुत्वाचा आरोप केला.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यापासून मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना हिंदूजननायक अशी उपाधी लावली. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंना पुढे करण्यात आले. मात्र आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक उल्लेख केला आहे. येत्या १४ मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. तत्पूर्वी पक्षाकडून टीझर, पोस्टर्स जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
“हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ‘आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असे नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,’ असे उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.
भाजप की महाविकास आघाडी? काय असेल संभाजीराजे यांची पुढची राजकीय वाटचाल
Read also:
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिंदुत्वाच्या अग्नीशी खेळण्याचा प्रयत्नही करु नका”; अकबरूद्दीन ओवेसीला मनसेचा इशारा
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”