मुंबई : राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या विनंतीला भाजपने मान दिला आहे. संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. काँग्रेसचा नेत्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मागच्या आठवड्यात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
काँग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन लोटांगण घातल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेते नाराज झाल्याची चर्चा होती. निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर त्या बदल्यात १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची देवेंद्र फडणवीसांनी मागणी केल्याची चर्चा होती.
Read Also :
- बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमुळे गुडघ्याचे बाशिंग सोडण्याची वेळ
- सत्ताधारी भाजप महानगरपालिका विकायला काढतील अशी शंका मला वाटते – राष्ट्रवादीचा घणाघात
- मोठी बातमी: शिवसेना नेते आनंदराव अडसुळ ईडीच्या ताब्यात; तब्येत बिघडल्याने रुग्णालयाकडे रवाना
- शिवीगाळीची व्हायरल ऑडिओ क्लिप माझी नाही, हे विरोधकांचे कटकारस्थान; भाजप आमदाराचे स्पष्टीकरण
- आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप